
यवतमाळ, २४ जानेवारी (वार्ता.) – ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकाचे लेखक भालचंद्र नेमाडे यांनी या पुस्तकात हिंदु धर्मासमवेत जिल्ह्यातील १२ कोटी बंजारा समाज बांधवांच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. त्या समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह लिखाण केले. स्त्री ही माता, भगिनी, अर्धांगिनी आणि देवी यांच्या रूपात हिंदु धर्मीय पूजतो. त्यामुळे भालचंद्र नेमाडे यांच्यावर आणि प्रकाशकावर गुन्हा नोंद करावा, तसेच नेमाडे यांचा ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या वतीने देण्यात आले.
या निवेदनानुसार कारवाई न झाल्यास विविध आंदोलने करण्यात येतील आणि पुढील सर्व पर्याय वापरण्यात येतील, अशी चेतावणी यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा समाजाने दिला आहे.
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
अनधिकृत मशिदीच्या विरोधात लढणार्या कोष्टी कुटुंबाला धर्मांधांकडून जिवे मारण्याची धमकी !
कसबा सांगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील धार्मिक स्थळांच्या परिसरात असलेली मांसाहाराची दुकाने बंद करा ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन