२८ धरणांत केवळ ४३.९९ टक्के पाणी !
अलिबाग – पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणार्या रायगड जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा अतिशय चिंताजनक स्थितीत आहे. २८ धरणांमध्ये केवळ ४३.९९ टक्के इतकाच पाणीसाठा शेष आहे. येथील अनेक धरणे ३० ते ४० वर्षांपूर्वी मातीने बांधण्यात आली होती; पण आता त्यांना गळती लागली आहे. त्यामुळेही पाणीसाठा न्यून होत आहे.
पेण तालुक्यातील आंबेघर धरण क्षेत्रात सर्वांत जास्त ७८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, तर श्रीवर्धन तालुक्यातील रानिवली धरण क्षेत्रात सर्वांत न्यून १२ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.
संपादकीय भूमिका
|