‘द्वापरयुगात महाभारत युद्धाच्या वेळी जेव्हा अर्जुनाने शोकाकुल होऊन धनुष्य टाकले, तेव्हा त्याच्या रथाचे सारथ्य करणार्या भगवान श्रीकृष्णाने त्याचे अज्ञान दूर करण्यासाठी त्याला श्रीमद्भगवद्गीता सांगितली. भगवान श्रीकृष्णाने केवळ अर्जुनालाच गीता सांगितली नसून ब्रह्मांडातील प्रत्येक जिवाचा उद्धार करण्यासाठी गीतारूपी ज्ञानगंगा प्रवाहित केली आहे. मार्गशीर्ष शु. प. एकादशीला (२५ डिसेंबरला) असणार्या ‘गीता जयंती’ ला जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाच्या पावन चरणी ही काव्यरूपी पुष्पांजली अर्पण करत आहे.


अर्जुन मोहजालात अडकला ।
आणि तो भ्रमाने ग्रासित झाला ॥
तो युद्धक्षेत्री शोकाकुल झाला ।
त्याने विषाद करूनी धनुष्यबाण त्यागला ॥ १ ॥
‘स्वकियांना शत्रू कसे मानावे ? ।
त्यांच्याशी कसे युद्ध करावे ? ॥
आप्तजनांना कसे मारावे ?।
या बिकट प्रसंगी काय करावे ? ॥ २ ॥
श्रीकृष्णाने अर्जुनाला दु:खी पाहिले ।
आणि त्याचे अंतरंग जाणले ॥
त्यास शोकातून मुक्त करण्याचे ठरवले ।
आणि त्याचे कल्याण योजले ॥ ३ ॥
अर्जुनाला सांगितला विषादयोग ।
कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग ॥
अर्जुनाला लाभला सुगमयोग ।
आणि त्याचा दूर झाला भवरोग ॥ ४ ॥
श्रीकृष्णाच्या मधुर वाणीतून ।
चैतन्य वाहे प्रत्येक शब्दातून ॥
जसा जीव मुक्त होतो मायापाशातून ।
तसा अर्जुन मुक्त झाला मोहजालातून ॥ ५ ॥
अर्जुनाला गूढ आत्मज्ञान झाले ।
दिव्य वाणीतून ज्ञानामृत लाभले ॥
त्याचे अस्तित्व श्रीचरणी समर्पित झाले ।
आणि त्याचे जीवन कृतार्थ झाले ॥ ६ ॥
कशी वर्णावी महती कृष्णाची ? ।
कशी वर्णावी कीर्ती देवाची ? ॥
काय सांगावी थोरवी भगवंताची ? ।
कशी सांगावी महती श्रीमद्भगवद्गीतेची ॥ ७ ॥
गीता असे सृष्टीचा मूलाधार ।
गीता असे भक्तीचा आधार ॥
गीता असे समस्त वेदांचे सार ।
गीता असे दिव्य ज्ञानाचे भांडार ॥ ८॥
अर्जुनाच्या भक्तीमय जिज्ञासेमुळे ।
आणि त्याच्या संपूर्ण शरणागत भावामुळे ॥
श्रीकृष्ण अर्जुनावर प्रसन्न झाले ।
आणि त्याच्यावर कृपावंत झाले ॥ ९ ॥
श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवले ।
आणि अर्जुनाच्या जीवनाचे सार्थक झाले ॥
नररूपी अर्जुनाला नारायणाचे दर्शन झाले ।
त्याच्या दर्शनाने समस्त अज्ञान दूर झाले ॥ १० ॥
देवांनाही अर्जुनाचा हेवा वाटला ।
भीष्मांनाही संवाद ऐकावा वाटला ॥
असा दैवी गीतोपदेश श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला ।
त्याला भवसागरातून तरण्याचा मार्ग दाखवला ॥ ११ ॥
गीतेमुळे जीवनाचे ध्येय सुस्पष्ट होते ।
ज्ञानाच्या तेजासह भक्तीचे अमृतही लाभते ॥
विविध योगमार्गांचे महत्त्व कळते ।
आणि जिवाची मोक्षाकडे वाटचाल होते ॥ १२ ॥
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२०)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी उपयोगात आणलेल्या साहित्याचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात लावलेले प्रदर्शन पहातांना पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे थेट प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !