सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार
‘एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘स्वार्थासाठी मागण्या करणारे नव्हे, तर त्याग करणारेच हिंदु राष्ट्र आणतील !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
‘समाज सात्त्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासनकर्ते ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखाद्या आंधळ्याने दृश्याचे वर्णन करावे, याप्रमाणे धर्माचे शून्य ज्ञान असलेल्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे धर्मासंदर्भातील बोलणे असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘भारतात इतर काही आयात करण्यापेक्षा राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नेते आयात करा. मग इतर काहीच आयात करावे लागणार नाही. भारत पुन्हा विश्वगुरु होईल आणि गतवैभव प्राप्त करील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात घेण्याचे कार्य करण्यापेक्षा ‘हिंदू धर्मांतरित होणार नाहीत’, हे कार्य करणे अधिक महत्त्वाचे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पैसा मिळवण्यापेक्षा त्याचा त्याग करणे अधिक सुलभ आहे, तरी मानव तो करत नाही, हे आश्चर्य आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अनेक गुन्हे करून आत्महत्या करणार्याला सरकार कशी शिक्षा करणार ? ईश्वर मात्र करतो. यावरून ईश्वराचे राज्य किती कल्पनातीत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले