भारतियांमधील देशभक्तीचा अभाव जाणा !
गलवान खोर्यातील संघर्षानंतरच्या ८ मासांत भारतियांकडून चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याऐवजी त्यांची खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढल्याचे सरकारी आकडेवारीतून उघड झाले आहे.
गलवान खोर्यातील संघर्षानंतरच्या ८ मासांत भारतियांकडून चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याऐवजी त्यांची खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढल्याचे सरकारी आकडेवारीतून उघड झाले आहे.
आयकर विभागाने मध्यप्रदेशातील बैतूल येथील काँग्रेसचे आमदार निलय डागा यांच्या सोया उत्पादन करणार्या आस्थापनातील गैरव्यवहारावरून डागा आणि कुटुंबीय यांच्या २२ ठिकाणांवर धाडी घालून ४५० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त केली.
झारखंडमध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसकडून ‘जन आक्रोश सभे’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंचावर नर्तकींकडून हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य करण्यात आले, तेव्हा मंचावर पक्षाच्या काही महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या.
केरळच्या तेनिपलम् शहरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेने मोपला हत्याकांडाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ ती घटना साजरी करण्यासाठी मिरवणूक काढली होती. या हत्याकांडामध्ये धर्मांधांनी सहस्रो हिंदूंचा नरसंहार केला होता.
हरिद्वार (उत्तराखंड) येथील कुंभमेळा १ एप्रिलपासून प्रारंभ होणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे ११ मार्चला महाशिवरात्रीचे राजयोगी स्नान ‘सामान्य स्नान’ ठरल्याने अखिल भारतीय आखाडा परिषदेने संताप व्यक्त केला आहे.
गलवान खोर्यात चीनच्या सैन्याशी झालेल्या संघर्षानंतर आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धेचे प्रायोजकत्व असणार्या चीनच्या विवो आस्थापनासमवेतचा वर्ष २०२० चा करार बीसीसीआयने स्थगित केला होता
फ्रान्सच्या संसदेत इस्लामी कट्टरतावादावर नियंत्रण ठेवण्यासाठी मांडण्यात आलेले विधेयक संमत करण्यात आले.
अफगाणिस्तानच्या दौलताबादमधील कुलतक गावामधील एका मशिदीमध्ये बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात असतांना झालेल्या स्फोटात ३० तालिबानी तरुणांचा मृत्यू झाला.
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून आलेल्या प्रलयामुळे २ जलविद्युत् प्रकल्प वाहून गेले असले, तरी येथे अजून ५८ प्रकल्प प्रस्तावित आहेत. दुसरीकडे अमेरिकेमध्ये धरणे फोडली जात असून आतापर्यंत १ सहस्र ७०० धरणे फोडण्यात आली आहेत.
मी श्रीराममंदिरासाठी पैसे दिल्याचे वृत्त रा.स्व. संघाने पसरवले आहे. या वृत्तामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची क्षमा मागतो, असे विधान केरळमधील काँग्रेसचे आमदार एल्धोस कुन्नाप्ली यांनी केले.