हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे काही पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा महान हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परमार्थात सूक्ष्म चिंतन आवश्यक असणे !

परमार्थात सूक्ष्म चिंतन आवश्यक असणे !

‘परमार्थ म्हणजे परम अर्थ. श्रेष्ठ असणार्‍या ‘आत्मतत्त्वाचा आत्मलाभ’ म्हणजेच परमार्थ आहे. अत्यंत सूक्ष्म अशा जाणिवेत चिंतन असावे. त्याकरता काळ, वेळ आणि ठावठिकाणा यांची कसलीच आवश्यकता नसते. ‘अंतरी अखंड समाधान’, हीच त्याची फलश्रुती होय !’

वैज्ञानिक संशोधनाची मर्यादा !

‘विज्ञानातील संशोधनाचे ध्येय म्हणजे मानवाला ईश्‍वरप्राप्ती नव्हे, तर फक्त शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सुखप्राप्ती करून देणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हल्लीच्या पिढीची कृतघ्नता !

‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी कृतघ्न झालेल्या हल्लीच्या पिढीला आई-बाबांची मालमत्ता हवी असते; पण वृद्ध झालेल्या आई-बाबांची सेवा करायची नसते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘शरिराची ठेवण, स्वभावातील गुण-दोष, कला, बुद्धी, धन इत्यादी घटकांचे ७५० कोटींपैकी २ व्यक्तींमध्येही साम्य नसते. असे असतांना ‘साम्यवाद’ या शब्दाला काही अर्थ आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘गरिबी असणे किंवा नसणे, यामागे ‘प्रारब्ध’ असे काही आहे’, हे ज्ञात नसलेले साम्यवादाच्या गप्पा मारतात आणि गरिबी असणारे किंवा नसणारे यांना समान करण्याचा प्रयत्न करतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले         

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदू इतर धर्मियांना केवळ साधना शिकवतात. हिंदू इतर धर्मियांप्रमाणे इतरांचे धर्मांतरण करत नाहीत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ख्रिस्ती, मुसलमान इतरांचे धर्मांतरण करतात, ते स्वत:चे संख्याबळ वाढावे म्हणून. याउलट हिंदू इतर धर्मियांना धर्म शिकवतात, तो इतर धर्मियांना मोक्ष मिळावा म्हणून !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले