‘ऋषी’राज !

ब्रिटनमध्ये आज जी अत्यंत बिकट आर्थिक स्थिती निर्माण झाली आहे, ती सावरण्यासाठी एक भारतीय वंशाची ‘ऋषी’ नाव असलेली व्यक्ती सज्ज झाली आहे, हा केवळ योगायोग नव्हे, तर ही कालगती आहे. भारतावर राज्य करणार्‍या ब्रिटिशांचा पंतप्रधान हिंदु वंशीय होणे, ही कालगतीच !

स्वागतार्ह निर्णय !

वास्तविक हा निर्णय पुष्कळ आधी व्हायला हवा होता; पण विलंबाने का होईना तो घेतला, हेही नसे थोडके ! खरेतर सरकारने विद्यार्थ्यांचा पाया, म्हणजे प्राथमिक शिक्षणातच मातृभाषा भरभक्कमपणे रुजवली, तर त्यांच्या आयुष्याची इमारतही अधिक मजबूत होईल. त्या दिशेनेही सरकारने पावले उचलावीत, ही अपेक्षा !

सत्तेची चिनी वाट !

भारताने चीन आणि जिनपिंग यांना समजेल अशा भाषेत धडा शिकवणेही आवश्यक आहे. त्यासाठी चीनच्या मालावर सरकारने कठोर निर्बंध आणणे आणि भारतियांनी थेट बहिष्कार घालणे. नाक दाबून तोंड उघडते आणि चीनलाही हीच भाषा समजते, हे सरकारने आता तरी लक्षात घ्यावे !

मूर्तीचोर आणि मूर्तीरक्षक !

भारतीय प्राचीन वारशांविषयी प्रेम, आदर आणि अस्मिता असणार्‍या कुमार यांच्यासारख्या सामान्य व्यक्तीने या वारशाच्या जतनासाठी भारतभर चळवळ उभारली. यासाठी त्यांनी दाखवलेली तळमळ, चिकाटी आणि घेतलेले परिश्रम हे कौतुकास्पद आहे

एस्.टी.ला निवृत्तीवेतनावरच जगवणार का ?

‘सरकारला एस्.टी. महामंडळाला खरोखरच सक्षम करायचे आहे का ?’, येथूनच या प्रश्नाचा प्रारंभ चालू होतो. मागील काही वर्षांचा एस्.टी. महामंडळाचा कारभार पाहिला, तर ‘तिला डबघाईला आणण्याचा प्रयत्न चालू आहे का ?’, असा प्रश्न पडतो. ‘एस्.टी.ला जगवायचे कि मारायचे आहे ?’, या सरकारच्या धोरणावर एस्.टी.चे पुनरुत्थान अवलंबून आहे.

लिज ट्रस पायउतार !

गेल्याच मासात भारताच्या अर्थव्यवस्थेने ब्रिटनसारख्या अर्थसंपन्न राष्ट्राला जागतिक क्रमवारीत मागे टाकले आहे. भारतीय वंशाचे सुनक पंतप्रधानपदी निवडून आल्यास भारताचा स्वाभिमान जागृत होईल; मात्र ब्रिटिशांचा दुखावेल. असे असले तरी ‘भारतियांविना ब्रिटनला गत्यंतर नाही’ हे ब्रिटिशांना उमजेल तो सुदिन !

प्रदूषणग्रस्त देहली !

देहली सरकारकडून प्रदूषण प्रतिबंधात्मक गोष्टी होत नसतील, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या उपाययोजना कशा होतील, ते पाहिले पाहिजे; अन्यथा चीनप्रमाणे एक मास सर्वच बंद करून सर्वांनाच घरात बसावे लागेल. परिस्थिती अशीच गंभीर राहिल्यास देहलीतही तो दिवस दूर नाही, हे निश्‍चित !

‘इस्लाम’विरोधी युरोप ?

भारताने आता घुसखोर मुसलमानांना हाकलवण्याचा नवा आदर्श निर्माण करण्याची आवश्यकता आहे. भारताने सांस्कृतिक राष्ट्रवादासह आता समान नागरी कायदा, कठोर शरणार्थी धोरण आदी विषयांना प्रभावीपणे हाताळावे, हीच भारतियांची अपेक्षा आहे !

हिंदुद्वेषी खदखद !

कलम ३७० रहित होण्याच्या माध्यमातून काश्मीरसमवेत एका अर्थाने न्याय झालेला आहे’, असे म्हणता येईल; पण या न्यायाची १०० टक्के फलनिष्पत्ती तेव्हाच मिळेल, ज्या दिवशी काश्मिरी हिंदूंना सन्मानाने आणि आदराने पुन्हा त्यांच्या भूमीत आणले जाईल. या दिवसाची प्रत्येकच हिंदु आतुरतेने वाट पहात आहे.

(अ)ज्ञानींचा विरोध !

देवतेचे नाव औषधाच्या चिठ्ठीवर लिहिले, तर चुकले कुठे ? आरोग्य रक्षणाची देवता म्हणून भारतात धन्वन्तरीची पूजा केली जाते. वैद्यकशास्त्रामध्ये कार्यरत असणारे मोठमोठे शस्त्रकर्म चिकित्सक किंवा तज्ञसुद्धा एखाद्या रुग्णाच्या कठीण स्थितीत स्वतःचे ज्ञान आणि अनुभव असूनही हतबल होतात…