राज्यात ५ वर्षांत नक्षलवाद्यांच्या भरतीचे प्रमाण उणावले !

कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश आहे. संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !

पुणे येथे ६ मासांत बलात्काराचे १७५, तर विनयभंगाचे २९५ गुन्हे नोंद !

धर्माचरणी समाजातच स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण न्यून होत असल्याने समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी एस्.टी. महामंडळ सज्ज

‘हर घर तिरंगा’ अभियानामध्ये एस्.टी. महामंडळाचे सर्व आगार आणि बसस्थानके यांवरील ध्वनीक्षेपकावरून धून आणि ध्वजगीत वाजवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे.

पुण्याच्या शिवसेना शहरप्रमुखांसह ५ जणांना अटक !

उदय सामंत यांचे वाहन कात्रज चौकात आल्यानंतर त्यांच्या वाहनावर आक्रमण होऊन गाडीची काच फुटली. या आक्रमणात गाडीतील एक व्यक्ती घायाळ झाली होती.

भाजपच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाची कारवाई झालेली दाखवा अन् १ लाख मिळवा !

अक्षय पाटील म्हणाले की, या देशात ऐतिहासिक बहुमताने भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. अनेक राज्यांत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार आहे. एवढ्यावरही त्यांची भूक भागत नसल्याने ते केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा अपवापर करत आहेत.

अमरावती येथे तरुणीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधास अटक !

गावात बांधकाम करण्यासाठी आलेल्या अरमान उपाख्य ऐफाज उपाख्य गोलू इबादउल्ला खान याची एका महाविद्यालयीन तरुणीसमवेत ओळख झाली. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्याने तिला फिरायला नेऊन बळजोरीने तिच्यावर अत्याचार केला.

श्री गणेशमूर्तींची विटंबना होत असल्याने कृत्रिम हौद उभारण्यात येऊ नयेत !

जळगाव येथे समन्वय बैठकीत गणेशभक्तांची शासन-प्रशासन यांच्याकडे एकमुखाने मागणी !

मनसे कार्यकर्ते शिंदे गटात गेल्याचा दावा खोटा ! – योगेश चिले, पनवेल शहराध्यक्ष

पनवेलमधून १०० मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा खोटा असल्याची माहिती मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी दिली आहे

महाराष्ट्र शासनाकडून ‘मूर्तीविसर्जनामुळे जलप्रदूषण होते का ?’ याच्या अभ्यासासाठी समितीची स्थापना !

नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते का ?, याच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र शासनाने एका समितीची स्थापना केली आहे. येत्या ३ मासांत ही समिती याविषयीचा अहवाल शासनाला सादर करेल.

मित्राविरुद्ध बलात्काराची तक्रार करू नये यासाठी केदार दिघे यांच्याकडून महिलेला धमकी !

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यावर ‘बलात्कार करणार्‍या मित्राची तक्रार करू नये, यासाठी एका महिलेला धमकी दिल्याचा’ गुन्हा नोंद करण्यात आला आहे