केंद्रशासनाच्या योजनेचा लाभ राज्यातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी शासन संपूर्ण प्रयत्न करील ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी घोषित केलेले १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य हे देशातील गोरगरीब, असंघटित क्षेत्रातील लोकांना दिलासा देणारे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याचे २६ मार्चला स्पष्ट झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे देशात दळणवळण बंद करण्यात आल्याने कामासाठी किंवा शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर असलेले अनेक जण अडकून पडले आहेत.

दळणवळण बंदीच्या काळात कृषीसंबंधित बियाणे, खते, कापणी यंत्र आणि वाहतूक यांसंदर्भात बंदी नाही ! – कृषीमंत्री दादा भुसे

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमध्ये कृषीसंबंधित बियाणे, खते, कापणीयंत्र आणि वाहतूक यांसंदर्भात कुठल्याही प्रकारची बंदी लादलेली नाही.

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे दळणवळण बंदी असतांनाही काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

येथे काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची दिवसाढवळ्या आणि दळणवळण बंदी असतांनाही गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे……….

भारतात ८०३ कोरोनाग्रस्त रुग्ण, २० जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आतापर्यंत ७५३ झाली असून एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

(म्हणे) ‘देवस्थानांनी स्वत:ची दानपेटी समाजासाठी उघडी करावी !’ – रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

देवस्थानकडून पैशांची अपेक्षा करणार्‍यांनी प्रथम स्वपक्षाची तिजोरी जनतेसाठी उघडावी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदीदारांचा हलगर्जीपणा !

शेतमाल खरेदीदारांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेची काळजी घेतली नसल्याने त्यांच्या या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांवर कोरोनाचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाईंदर येथे संचारबंदीचा अपलाभ घेत गुटखा पुरवणार्‍याविरुद्ध गुन्हा नोंद

समाजास बाधक ठरणार्‍या व्यसनाधीनतेला वेळीच आळा बसायला हवा. पोलिसांनी यासाठी कठोर पावले उचलावीत, हीच अपेक्षा !

शासनाच्या संचारबंदीच्या आदेशाला तिलांजली

शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास २७ मार्चपासून अनुज्ञप्ती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी दुकाने उघडी होती. गेले काही दिवस किराणा दुकाने बंद असल्याने लोकांनी किराणा माल खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये एकच गर्दी केली.