विस्मरणावर प्राथमिक उपचार – सनातन ब्राह्मी चूर्ण

सनातनची आयुर्वेदाची औषधे

हिरड्या, जीभ आणि घसा यांना दातांएवढेच महत्त्व देऊन त्यांची काळजी कशी घ्यावी ?

अनेकांकडून गांभीर्याने दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन त्यांची काळजी घेतली जाते, तेवढी हिरड्या, जीभ आणि घसा यांच्याविषयी न घेता त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.

आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने शरिराला उटणे लावण्‍याचे महत्त्व

उटणे हे केवळ दिवाळीच्‍या वेळी न लावता नियमित लावून अतीरिक्‍त कफ, चरबी आणि वजन अल्‍प करून त्‍वचेला आरोग्‍य संपन्‍न ठेवा !

आयुर्वेदोक्त दंतधावन (दात घासणे) कसे करावे ?

‘वसंतऋतूचे आगमन झाले आहे. या काळात कफ विकार नैसर्गिकरित्या होतात; पण त्याचा त्रास होऊ नये म्हणून किमान या काळात तरी आयुर्वेदोक्त दंतधावन करायला हवे.

उन्हाळ्यात उपयुक्त सनातन उशीर (वाळा) चूर्ण !

उन्हाळ्यामध्ये प्रतिदिन पिण्याच्या पाण्यामध्ये सनातन उशीर (वाळा) चूर्ण मिसळून प्यावे. असे केल्याने उष्णतेच्या विकारांना प्रतिबंध होण्यास साहाय्य होते.

त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदाचे उपचार

जांघा, काखा, मांड्या, नितंब (कुल्ले) इत्यादी भागांवर जेथे घामामुळे त्वचा ओली रहाते, तेथे काही वेळा खाज सुटून लहान लहान फोड येतात आणि ते पसरत जाऊन गोलसर आकाराची चकंदळे निर्माण होतात. या चकंदळांच्या कडा उचललेल्या, तांबूस आणि फोडयुक्त असून मध्यभाग मात्र पांढरट अन् कोंडा असलेला असा दिसतो.

वात, पित्त आणि कफ यांचे स्‍वभाव किवा गुण अन् त्‍यांचे कार्य !

वात, पित्त आणि कफ या दोषांबद्दल समजून घ्‍यायचे असेल, तर … समजा दोन व्‍यक्‍तींचे भांडण चालू आहे आणि दोघेही रागीट असतील, तर त्‍यांचे भांडण न्‍यून होण्‍याऐवजी वाढत जाईल. याउलट त्‍यातील एक व्‍यक्‍ती शांत असेल, तर भांडण लवकर मिटेल. असेच या दोषांच्‍या संदर्भात आहे.

दुपारच्‍या वेळेत बाहेर जायचे असल्‍यास उन्‍हापासून संरक्षण होईल, अशी उपाययोजना करा !

सध्‍या दुपारच्‍या वेळेत उन्‍हाची तीव्रता पुष्‍कळ वाढली आहे. त्‍यामुळे दुपारच्‍या वेळी बाहेर जायचे असल्‍यास उन्‍हापासून संरक्षण होण्‍यासाठी छत्री, गॉगल इत्‍यादींचा वापर करावा.

वसंत ऋतूमध्‍ये निरोगी रहाण्‍यासाठी सोपे उपाय

नियमित व्‍यायाम करणे, सकाळी १० वाजेपर्यंत काही न खाणे, भूक लागल्‍यावरच खाणे, रात्री ८ वाजेपर्यंत जेवणे आणि पुरेशी झोप घेणे एवढ्याच गोष्‍टींचे पालन केले, तरी वसंत ऋतूमध्‍ये होणार्‍या विकारांना प्रतिबंध होऊ शकतो.

आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने ऋतूची लक्षणे दिसू लागली की, ऋतू चालू होणे

चैत्र-वैशाख (हा) वसंत ऋतू’ असे आपण शाळेत शिकलेलो आहोत. हे कालमापनाच्‍या दृष्‍टीने योग्‍य आहे; परंतु आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने ‘जेव्‍हा ऋतूची लक्षणे दिसू लागतात, तेव्‍हा तो ऋतू’, असे म्‍हणतात.