
१. ‘रात्रीचे जेवण जेवढे उशिरा ग्रहण होईल, तेवढा जठराग्नीवर अधिक ताण येतो. त्याचा पचनसंस्थेवर दुष्परिणाम होतो.
२. रात्री उशिरा जेवल्यानंतर अन्य कोणत्याही कृती (हालचाल) न करता थेट झोपले जाते.
३. याचा परिणाम म्हणून शरिरातील कफ दोष वाढून अजीर्ण होणे, वजन वाढणे, सकाळी उठल्यावर अजीर्णामुळे चेहर्यावर सूज येणे, डोळे जड होणे आदी लक्षणे निर्माण होतात.
४. शरिराची सकाळची सर्व तंत्रे (मल प्रवर्तन आणि भूकेची जाणीव होणे इत्यादी) बिघडतात.
वरील सर्व दिनचर्येतील केवळ एका अयोग्य कृतीमुळे होते आणि ते म्हणजे रात्री उशिरा जेवण ग्रहण करणे होय ! त्यामुळे सायंकाळी लवकर म्हणजे सूर्यास्तापूर्वी जर जेवण ग्रहण करण्याची एक कृती केली, तर वरील अनेक अडचणी आपोआप सुटतात. औषधांची आवश्यकता भासत नाही; म्हणून योग्य वेळी आहार घेऊन रोगमुक्त जीवन जगा !’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (१४.१२.२०२२)
(संपर्कासाठी ई-मेल : [email protected])
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
लैंगिक आरोग्य आणि स्त्री
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !