संपादकीय : रेल्वे जिहाद !

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वेस्थानकापासून ७०० मीटर अंतरावर रेल्वेरुळांवर सिमेंटचा मोठा दगड ठेवलेला लक्षात आल्याने चालकाने मालगाडी थांबवली. त्यामुळे मोठा अपघात आणि हानी टळली. मागील आठवड्यात घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे. ओव्हरहेड वायरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ‘टॉवर वॅगन’ला कुर्डुवाडीकडे नेतांना कर्मचार्‍यांना हा दगड दिसला आणि त्यांनी मालगाडी २०० मीटर आधीच थांबवली. ही घटना वाटते तेवढी साधी नाही. नुकतीच राजस्थानमधील अजमेर आणि ८ सप्टेंबरला उत्तरप्रदेशातील कानपूर येथेही या घटना घडल्या आहेत. कानपूर येथे रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर सापडला. इतकेच नव्हे, तर मागील महिन्यात म्हणजे एकट्या ऑगस्टमध्येच अशा १८ हून अधिक घटना देशभरात समोर आल्या आहेत, तर मागील वर्षी अशा प्रकारे रेल्वेचा अपघात घडवून आणण्याच्या देशात तब्बल २४ घटना घडल्या आहेत. २८ फेब्रुवारीला झारखंडमधील रेल्वे अपघातात २ जण ठार झाले, १० फेब्रुवारीला देहलीतील अपघातात १० डबे घसरले, १७ जूनला बंगालमधील अपघातात १० जण, तर त्याच दिवशी दार्जिलिंगमधील रेल्वे अपघातात ५ जण, १८ जुलैला उत्तरप्रदेशातील अपघातात ४ जण मृत्यूमुखी पडले. ३० जुलैला झारखंडमध्ये १८ डबे घसरले. १७ ऑगस्टला कानपूरजवळ २२ डबे घसरले. या सर्वांत प्रचंड वित्तहानी झाली आणि शेकडो जण घायाळ झाले, ते वेगळेच ! देशावर कर्जाचा डोंगर असतांना अशा अपघातांमुळे तांत्रिक हानी होऊन कोट्यवधी रुपयांची हानी होते. प्रवाशांसाठी रेल्वेप्रवास असुरक्षित करणारा आणि सहस्रो जिवांशी निगडित असणारा हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. मागील वर्षी ओडिशामध्ये ३ गाड्यांच्या झालेल्या मोठ्या अपघातात २३३ जणांनी जीव गमावला, तर ९०० जण घायाळ झाले. त्याची सिग्नल यंत्रणा सांभाळणारा मुसलमान कर्मचारी नंतर पसार झाल्याचे वृत्त आले.

‘रेल्वे जिहाद’च्या आव्हानाचा बीमोड कसा करणार ?

वर्ष २०१६ पासून ‘रेल्वे जिहाद’ भारतात चालू आहे. काही वेळा तो यशस्वी होतो, तर काही वेळा देवाच्या कृपेने अयशस्वी ! कानपूरमध्ये वर्ष २०१६ मध्येही अशा प्रकारे रेल्वेचा अपघात झाला होता, त्यात १५० लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्याचा पाकशी थेट संबंध असल्याचे लक्षात आले होते. वर्ष २०१७ मध्येच रेल्वे जिहाद प्रकरणी एका आतंकवाद्याला उत्तरप्रदेशमधील लक्ष्मणपुरी येथे चकमकीत ठार मारण्यात आले होते. आता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) पुराव्यांनिशी कानपूर येथील घटनेत ‘आय.एस्.आय.एस्. खुरासान’ या संघटनेचा हात असल्याचे सांगितले आहे. इराक आणि अफगाणिस्तान येथील अत्यंत जहाल अन् मोठी आतंकवादी संघटना समजली जाणार्‍या ‘आय.एस्.आय.एस्. खुरासान’ने विविध ठिकाणी पुष्कळ मोठी आतंकवादी आक्रमणे केली आहेत. या यंत्रणेसमवेत आतंकवादविरोधी पथक आणि इंटेलिजन्स ब्युरो अशा ३ संघटना मिळून हे अन्वेषण करत आहेत. त्याच्याजवळ रेल्वे रुळांवर अपघात करण्यासाठी आणलेले सिलिंडर मिळाले होते. अयोध्येतील प्रभु श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर १ मार्च या दिवशी बेंगळुरू येथील ‘रामेश्वरम् कॅफे’मध्ये केलेल्या बाँबस्फोटातील आरोपी फरतुल्ला गोरी या आतंकवाद्याने मुसलमानांना ‘रेल जिहाद’ करण्याचे आवाहन केले आहे.

८ सप्टेंबरच्या कानपूरमधील अपघाताच्या वेळी जिहाद्यांनी केवळ सिलिंडरच रुळांवर ठेवला नव्हता, तर आजूबाजूला पेट्रोलचे डबे, काडेपेट्या, स्पोटके यांसारख्या गोष्टीही ठेवल्या होत्या. जेणेकरून रेल्वेच्या धक्क्याने सिलिंडर फुटल्यावर प्रचंड आग लागून रेल्वेतही आग पसरेल. अजूनही दिवास्वप्नात वावरणारे काही भारतीय आणि माध्यमे याला ‘शरारत’ (खोडसाळपणा) म्हणून सोडून देत असतील, तर अन्वेषण यंत्रणेने सांगितलेले हे वास्तव त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे. मागच्याच महिन्यात, म्हणजे १ ऑगस्टला गुलझार शेख याला ‘रेल जिहादी’ म्हणूनच अटक करण्यात आली आहे. तो रेल्वेरुळांवर सिलिंडर, दगड, सायकल आदी गोष्टी ठेवून त्याचे व्हिडिओ बनवून यू ट्यूबवर प्रसारित करायचा. सहस्रो लोकांच्या प्राणांशी खेळणे, ही काय खेळ खेळण्याची गंमत किंवा पैसे कमावण्याचा मार्ग असू शकतो का ? आणि मुसलमानांनाच इतरांचे प्राण घेणारे खेळ अन् व्हिडिओ बनवायला कसे सुचतात ? त्याच्या ‘इंडियन हॅकर’ या यू ट्यूब वाहिनीचे २ लाख ३५ सहस्र अनुयायी असल्याचे लक्षात आले. त्याने असे अनेक व्हिडिओ प्रसारित केले, तरी अशांच्या यू ट्यूब वाहिन्यांवर यू ट्यूब बंदी घालत नाही किंवा त्यांच्यावर कुठलीही बंधने घालत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

स्थानिकांचा सहभाग आणि इकोसिस्टम !

‘कानपूर रेल्वे अपघात प्रकरणी सिलिंडर कुठून आणला ?’, या अनुषंगाने मार्ग काढत पोलिसांनी हा शोध लावला. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा या प्रकरणी वेगाने कामाला लागली. या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्यत्वे वरील आतंकवादी संघटना स्थानिक देशद्रोह्यांना हाताशी धरून ही आक्रमणे करत आहे; कारण आतापर्यंत पकडल्या गेलेल्या बहुतांश घटनांत अपघात टळले आहेत. सराईतपणे शिकवणी न मिळाल्याने देवाच्या कृपेने या घटना निष्फळ ठरल्या आहेत, असे लक्षात आले आहे. येथे मदरशांतून घरोघरी स्थानिक जिहादी सिद्ध होत आहेत. ही मुसलमानांची इकोसिस्टम (यंत्रणा) आहे. मदरशांत कट्टरता जोपासायला पैसा पुरवायचा, भारतातील जिहादी कृत्याविषयी फरतुल्ला गोरी यांसारख्या काहींनी फतवे काढायचे आणि स्थानिक मुलांनी अशी जिहादी कृत्ये करायची ! गोरी हा पाकमधील आतंकवादी असून तो भारतीय यंत्रणांसाठी ‘वॉटेंड’ (हवा असलेल्या) सूचीत आहे. या साखळीत सहभागी असणार्‍या सर्व स्थानिक जिहाद्यांना पकडल्यावर त्यांना सर्वांसमोर कठोर शिक्षा झाली, तरच अन्य स्थानिक जिहाद्यांवर वचक बसू शकतो. अजमेर येथे ७० किलो वजनाचे २ सिमेंटचे दगड रुळावर ठेवण्यात आले होते. ते स्थानिकांकडे कुठून आले ? याचा शोध चालू आहे.

रेल्वे सुरक्षेच्या संदर्भात विरोधी पक्ष आता प्रश्न विचारत आहे की, रेल्वे सुरक्षेशी संबंधित ३ लाखांहून अधिक पदे रिकामी का आहेत ? सर्वच क्षेत्रांत अशी पदे रिकामी आहेत. रेल्वेतही असतील, तर नवल नव्हे; परंतु आता त्याचा थेट सहस्रो जिवांच्या सुरक्षेशी संबंध येत आहे. सोलापूरजवळील रेल्वेरुळाच्या परिसरात आतापर्यंत अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्याचे लक्षात येत आहे. कानपूर, अजमेर, सोलापूर या तिन्ही ठिकाणी स्थानिक मुसलमानांची मोठी वस्ती आहे. त्यामुळे रेल्वे जिहादच्या आंतरराष्ट्रीय धाग्यादोर्‍यांना स्थानिक धर्मांध प्रत्यक्षात उतरवत असल्याने यंत्रणा या स्थानिक जिहाद्यांचा बंदोबस्त कशा करणार आहेत ? याचे मोठे आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. तोपर्यंत मात्र प्रत्येक प्रवाशाने आणि रेल्वे कर्मचार्‍याने अधिक सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. रेल्वे रुळांजवळची धर्मांधांची वस्ती बुलडोझरद्वारे भूईसपाट करणे, हा एक त्यावरील उपाय आहे.

रेल्वे जिहादच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी स्थानिक जिहाद्यांचे कंबरडे मोडणे आवश्यक !