
‘धर्मशास्त्रामध्ये सोने, चांदी अथवा माती यांपासूनच मूर्ती बनवावी’, असा स्पष्ट उल्लेख असल्याने या व्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य आहे. येथे ‘व्यावहारिकदृष्ट्या मातीपासून मूर्ती बनवण्याचा एकच पर्याय दिला आहे’, हे स्पष्ट आहे. ‘धर्मसिंधू’ या ग्रंथातही ‘विनायकाच्या व्रतासाठी मृण्मयी म्हणजे मातीची मूर्ती बनवावी’, असे सांगितले आहे. अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती चिकणमातीपासून अथवा शाडूच्या मातीपासून बनवलेली असावी. ती नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे श्री गणेशाची स्पंदने मूर्तीकडे आकृष्ट होतात आणि प्रदूषणही होत नाही. श्री गणेशचतुर्थीला गणेशाचे पूजन करण्यासाठी आणावयाची मूर्ती एक ते दीड फूट उंच असावी, ती पाटावर बसलेली असावी. मूर्ती डाव्या सोंडेची असावी. (दैनिक ‘सनातन प्रभात’)
(म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण करणे चुकीचे असेल, तर सर्व सण साजरे करण्यावरही बंदी घाला !’ : AIMIM Chief Owaisi
बकर्यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !
पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी रत्नागिरी पालिका ‘गोल्डन ड्रॉप’ तंत्रज्ञानाचा वापर करणार
पुणे शहराच्या बाणेरमधील सुप्रसिद्ध बगाड उत्सवाला अनुमती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा !
अधिक मासातील वर्ज्य कर्मे आणि विहित (करता येणारी) कर्मे !