लव्ह जिहाद प्रकरणी पोलिसांनी तक्रार न घेतल्यास पोलीस ठाण्यात येऊन खडसावीन ! – नितेश राणे, आमदार, भाजप

पलूस (जिल्हा सांगली) येथे ‘शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा’ !

मोर्चात सहभागी हिंदू

पलूस (जिल्हा सांगली), १५ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदूंच्या विरोधात ‘लव्ह जिहाद’ हे मोठे षड्यंत्र आहे. ‘लव्ह जिहाद’चे एखादे प्रकरण घडले की, पोलीस वडिलांना ‘मुलगी तुमचीच आहे ना ?’ असा प्रश्न विचारतात; मात्र तुम्ही पोलीस पण आमचेच आहात ना ? कि बाहेरून आला आहात. आमचेच खाता ना ? आमच्याच वेतनावर रहाता ना ? आमच्या हिंदुत्वाकडे कुणीही वाकड्या दृष्टीने पहायचे नाही. पोलीस ठाण्यात महिला-भगिनींच्या आलेल्या तक्रारीनुसार अर्ध्या घंट्यांत गुन्हा नोंद न केल्यास पुढील ३ घंट्यांत मी तुमच्या पोलीस ठाण्यात येऊन खडसावीन, अशी चेतावणी भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी येथे दिली. पलूस येथे नितेश राणे यांच्या उपस्थितीत १३ ऑगस्ट या दिवशी ‘शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या मोर्च्याचा प्रारंभ बौद्ध वसाहत येथून होऊन शिवाजी चौकमार्गे शिवतीर्थापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

आमदार श्री. नितेश राणे म्हणाले की, सरकार हिंदुत्वनिष्ठ आहे. जिहादींनी मस्ती केली, तर त्यांना ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी हिंदूंनी सिद्ध रहावे. आपण देवाकडे प्रार्थना करणार की, आई भवानी शक्ती दे आणि विशाळगडाला मुक्ती दे. मी नुसते तोंडावर बोलत नाही, मी कुणाला धमकी देत बसत नाही; पण शेवटी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आम्हाला मारले जात आहे. त्यांच्यामध्ये धाक निर्माण होईल, असे केले पाहिजे. वक्फ मंडळाचा कायदा येथे चालू देणार नाही. हा कायदा आपल्या देशामध्ये लागू शकत नाही. हिंदु राष्ट्राचे आपणच संरक्षण केले पाहिजे. आमदार, खासदार यांच्या अगोदर ‘आपण हिंदु आहोत’, हे लक्षात घ्या.

छत्रपती संभाजीनगरच्या रणरागिणी हर्षदाताई ठाकूर म्हणाल्या की, हिंदूंना ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्याची मागणी करावी लागते, हे दुर्दैवी आहे. मुसलमानांच्या मुलीवर जर असा अत्याचार झाला असता, तर आज जिहादींनी भारत पेटवला असता. हिंदू झोपले आहेत का ? हिंदूमध्ये एकता नाही ? मोर्चे कुठवर काढायचे ? हिंदु राष्ट्र बनवणे आवश्यक आहे. हिंदूंनी धर्मासाठी कट्टर होणे आवश्यक आहे. धर्मांतरविरोधी, ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा झालाच पाहिजे.

माजी खासदार अमर साबळे म्हणाले की, हिंदू कमकुवत झाल्यावर मुसलमानांना माज येतो. जे बांगलादेशामध्ये घडले, ते आपल्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही. जो आपला धर्म आणि संस्कृती बुडवण्याचा प्रयत्न करतो, त्याला थारा देऊ नका. मुसलमान हे अशांतीसाठी सांप्रदायिक दंगे करतील, तसेच ते कधीही देशभक्त होणार नाहीत, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंनो, हिंदु बांधवांकडूनच वस्तू खरेदी करून हिंदु धर्मासाठी संघटित व्हा !