विशाळगडावर हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर गुन्हे नोंदवावेत ! – सकल हिंदु समाज

निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

नाशिक – विशाळगडावरील अतिक्रमण हटवणे आणि गडावरील पशूहत्या कायमची बंद करणे, या मागणीसाठी १४ जुलै या दिवशी हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन केले होते; मात्र धर्मांधांनी त्यांच्यावरच सशस्त्र आक्रमण केले. याविषयी धर्मांधांवर गुन्हे नोंदवून कारवाई करावी, या मागणीसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने नाशिक येथील निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना देण्यात आले.

‘घडलेल्या प्रकाराला प्रशासन उत्तरदायी आहे. यासाठी संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे नोंदवावेत. शिवभक्तांवर गुन्हे नोंदवल्याप्रकरणी सकल हिंदु समाज निषेध व्यक्त करत आहे. अशा प्रकारे गुन्हे नोंदवले जात असतील, तर सकल हिंदु समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल’, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली.

या वेळी सकल हिंदु समाज नाशिकच्या वतीने सर्वश्री कैलास पंडित देशमुख, सागर देशमुख, नंदकिशोर भावसार, विनोद शिंदे, अजय बागुल, भरत डांगरे, उमेश सूर्यवंशी, मंदार बर्वे, राहुल कदम, प्रशांत दिवटे, निखिल पाटील, देविदास चव्हाण, संग्राम फडके, सोनू नागरे, सचिन शिकारे, कु. रागेश्री देशपांडे आदी सर्व हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.