
नवी देहली – लोकसभेच्या निवडणुकांचा चौथा टप्पा १३ मे या दिवशी पार पडला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत देशभरात एकूण ६२.३१ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान हे बंगालमध्ये झाले. तेथे ७५.६६ टक्के लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला, तर आंध्रप्रदेशमध्ये ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले.
चौथ्या टप्प्यात ९ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेश येथील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान झाले. यांमध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा, झारखंड, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, तसेच केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर येथे मतदान पार पडले.
कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच श्रीनगरमध्ये मतदान !
विशेष म्हणजे कलम ३७० हटवल्यानंतर श्रीनगर येथे प्रथमच मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३५ टक्क्यांहून अधिक लोकांनी मतदान केले. वर्ष २०१९ मध्ये केवळ १४.४३ टक्के लोकांनी मतदान केले होते, तर वर्ष २०१४ मध्ये हा आकडा २५ टक्के होता.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ