बार्सेवाडा (गडचिरोली) येथील ३ जणांना जादूटोण्याच्या संशयावरून जिवंत जाळले !

गडचिरोली – १ मे या दिवशी एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून एका महिलेसह २ जणांना काही गावकर्‍यांनी मिळून जिवंत जाळले. जमनी तेलामी (५२ वर्षे), देऊ आतलामी (६० वर्षे) अशी मृतांची नावे असून या प्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे जादुटोणा करीत असल्याचा संशय काही गावकर्‍यांना होता. संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास गावकर्‍यांनी एकत्र येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. त्यानंतर मरणासन्न अवस्थेत असलेल्या दोघांना ओढत नेत रात्री १० वाजता गावाबाहेरील नाल्यात टाकून पेटवून दिले.