
मुंबई, २७ मार्च (वार्ता.) – लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात विविध राजकीय पक्षांकडून सायंकाळी उशिरापर्यंत १६० जणांनी अर्ज केले. यामध्ये रामटेक मतदारसंघातून ४१, नागपूर ५७, भंडारा-गोंदिया ९, गडचिरोली १३ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून ४० उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही नागपूर मतदारसंघातून २७ मार्च या दिवशी उमेदवारी अर्ज भरला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या टप्प्याचा २७ मार्च हा शेवटचा दिवस होता. २८ मार्च या दिवशी या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. ३० मार्च हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.
हार्बर रेल्वेत लावली आहेत ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारी पत्रके !
१ सहस्र ४४५ कोटी रुपयांच्या ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ !
‘बेस्ट’च्या संपामुळे प्रवाशांचे हाल; दगडफेकीसह तोडफोडीच्या घटना !
खराडीतील भोंदू राधामोहन मिश्रासह ८ जण कह्यात !
‘स्मार्ट मीटर’ची बळजोरी केल्यास तीव्र आंदोलन करणार !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरसह महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर ६० दिवस ड्रोनबंदी !