आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे येथे गुन्हा नोंद !

श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

ठाणे, ११ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात श्रीरामांविषयी एकेरी उल्लेख करून प्रभूंचा आहार, वनवास यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे माझ्या, तसेच समस्त हिंदु बांधवांच्या भावना दुखावल्याचे सांगत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी ठाणे येथील भाजपच्या पदाधिकारी सेजल संजय कदम यांनी वर्तकनगर पोलीस ठाणे येथे केली होती. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.