
दुर्जनेन समं सख्यं वैरं चापि न कारयेत्।
उष्णो दहति चाङ्गारः शीतः कृष्णायते करम्॥ – हितोपदेश, मित्रलाभ, श्लोक ८१
अर्थ : कोळश्याप्रमाणे असलेल्या दुर्जनाशी मैत्री आणि वैर दोन्ही करू नये; कारण कोळसा उष्ण असला, तर जाळतो आणि थंड असला, तर हात काळा करतो.
एका सैतानाने एका गरीब कष्टाळू शेतकर्याचा नाश करायचे ठरवले. त्याने शेतकर्यावर चोरीचा आळ यावा; म्हणून प्रयत्न केला; पण तो अपयशी ठरला. शेवटी त्याने त्या शेतकर्यासह मैत्री केली. त्याचा विश्वास संपादन केला. त्याला दारूचे व्यसन लावले. हळूहळू तो शेतकरी इतका बिघडला की, आपल्या कुटुंबातील लोकांना मारहाण करू लागला, त्याचा अंत झाला. सैतानाला शत्रुत्व करून जे करता आले नाही, ते त्याने मैत्री करून साधले; म्हणून दुर्जनासमवेत मैत्रीसुद्धा करू नये.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय