अकार्यक्षम पोलीस प्रशासन !

अकोला – तालुक्यातील म्हैसांग येथील दर्यापूर मार्गावर पूर्णा नदी काठावर असलेले कचरू महाराज संस्थान येथे ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री २ चोरट्यांनी दानपेटी चोरली. गेल्या वर्षभरात ५ वेळा येथे चोरी झाली आहे.
चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाले आहेत. चोरांनी दानपेटी चोरून ती एका शेतात नेऊन फोडली आणि त्यातील रोख पळवली. या घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना देण्यात आली. ‘या घटनेची तात्काळ चौकशी करून चोरट्यांना अटक करावी’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संपादकीय भूमिकाएका संस्थानातील दानपेटीची पाचव्यांदा चोरी होत असतांनाही पोलीस यंत्रणा झोपा काढत होती का ? या संस्थांनात प्रथम चोरी झाल्यानंतर पोलिसांनी येथे पुन्हा चोरी होणार नाही, यासाठी उपाययोजना काढायला हवी होती. ती न काढल्यानेच असा प्रकार सतत होत आहे. यापुढे तो होणार नाही, याचीही शाश्वती देता येत नाही. जनता आणि तिच्या मालमत्तेचे रक्षण करू न शकणार्या अशा निष्क्रीय पोलीस यंत्रणेला जनतेच्या पैशातून पोसायचे कशाला ? |
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
पिंपळी खुर्द आणि सती पुलाजवळील प्रदूषणकारी ‘भंगार व्यवसायां’च्या विरोधात कारवाई करा !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !