छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणार्‍या जिजाऊंसारख्‍या मातांची आज आवश्‍यकता !

राजमाता जिजाऊ

देशाची आजची स्‍थिती मध्‍ययुगीन काळात राजमाता जिजाऊ यांच्‍या बालपणी जशी भयावह होती, तशी आहे. आम्‍ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करतो; परंतु त्‍यांना कुणी घडवले, याचा मात्र विचार करत नाही. संस्‍कृती आणि संस्‍कार यांमुळेच देश घडतो, हे राजमाता जिजाऊ यांनीच आपल्‍याला शिकवले आहे. त्‍या काळात म्‍हणजे वर्ष १६३० मध्‍ये त्‍यांच्‍या सासर-माहेरचे सर्वच पुरुष मुसलमानांच्‍या सैन्‍यात नोकरी करत होते. हिंदु लढत असत आणि विजय मुसलमानांचा होत असे. जिजाऊंनी हे सर्व हेरले आणि त्‍यांनी मनोमन एक निश्‍चय केला आणि त्‍याप्रमाणे त्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवायला आरंभ केला. त्‍यांनी राजांना लहानपणापासूनच ‘रामायण’, ‘महाभारत’ आणि वैदिक धर्म यांचे ज्ञान दिले. त्‍यामुळेच शिवरायांमध्‍ये स्‍वराज्‍य रक्षणासह धर्मरक्षणही करण्‍याची क्षमता निर्माण झाली. आज आपल्‍याला जिजाऊंसारखी माता हवी आहे. राजमाता जिजाऊंचे विचार, संस्‍कार आणि संस्‍कृती यांची आज आपल्‍याला नितांत आवश्‍यकता आहे.

– श्री. विनोदकुमार सर्वोदय, उत्तरप्रदेश