केवळ मणीपूर नव्हे, तर सर्व राज्यांतील हिंसाचारावर चर्चा होणे आवश्यक ! – खासदार चिराग पासवान

लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान

नवी देहली – सर्व राज्यांतील हिंसाचारावर चर्चा व्हायला हवी. भाजप मणीपूरमध्ये सत्तेवर असल्याने केवळ त्या राज्यातील हिंसाचारावर चर्चा करणे अयोग्य आहे.

राजस्थान, बंगाल, कर्नाटक या राज्यांत होणार्‍या घटनांवरही चर्चा होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे दुजाभाव ठेवून चर्चा करणे पूर्णत: अयोग्य आहे, असे वक्तव्य लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान यांनी केले.