संसदेतील सततच्या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचा निर्णय !

नवी देहली – संसदेत मणीपूरच्या हिंसाचारावरून विरोधी पक्षांकडून गेले ९ दिवस गदारोळ घातला जात असतांना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी १० व्या दिवशी लोकसभेच्या कामकाज चालवण्यास नकार दिला. ‘जोपर्यंत संसदेच्या मानसन्मानानुसार सदस्य वागणार नाहीत, तोपर्यंत लोकसभेचे कामकाज चालवणार नाही’, अशी त्यांनी चेतावणी दिली. संसदेचा मान राखणे, हे सर्वांचे सामूहिक दायित्व आहे. काही सदस्यांचे वागणे परंपरेच्या विरुद्ध आहे.
#BreakingNews: विपक्ष के हंगामे से स्पीकर ओम बिरला नाराज़, लोकसभा में अध्यक्षता नहीं करेंगे#MonsoonSession #INDIA @thakur_shivangi @JournoPranay pic.twitter.com/fau710tx7T
— Zee News (@ZeeNews) August 2, 2023
संसदेचे कामकाज २ ऑगस्टला सकाळी चालू झाल्यावर लगेच गदारोळ चालू झाल्याने १५ मिनिटानंतरच दुपारी २ पर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले.
संपादकीय भूमिकाअशा निर्णयामुळे गदारोळ घालणार्या सदस्यांवर काहीही परिणाम होणार नाही. याऐवजी लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात गदारोळ करणार्या सदस्यांना संसदेबाहेर काढण्याचे, निलंबित करण्याचे आदी निर्णय घेणे अपेक्षित आहे. वर्गात मुले दंगा करू लागल्यास शिक्षक त्यांना वर्गाबाहेर ओणवे उभे करतात आणि शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात ! असा कठोर निर्णय अध्यक्षांनी घ्यावा, असेच नागरिकांना वाटते ! |
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय