नवी देहली – देशात वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांत १३ लाख १३ सहस्रांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. १८ वर्षांहून अधिक वयाच्या १० लाख ६१ सहस्र ६४८ महिला आणि त्याहून अल्प वयाच्या २ लाख ५१ सहस्र ४३० मुली वर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीत देशभरात बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या आठवड्यात संसदेत सादर केलेल्या आकडेवारीत दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने ही आकडेवारी दिली आहे. देशभरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना केल्या असल्याचीही माहिती सरकारने या वेळी दिली. यात लैंगिक अत्याचारांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी ‘गुन्हेगारी कायदा (सुधारणा) कायदा २०१३’ अंमलात आणण्याचा समावेश असल्याचे सरकारने सांगितले.
दो साल में 13 लाख से ज्यादा लड़कियां और महिलाएं हुईं लापता, MP में सबसे ज्यादा केस#MadhyaPradesh
https://t.co/gMAbamOihm— AajTak (@aajtak) July 30, 2023
१. सर्वाधिक मुली आणि महिला मध्यप्रदेश, त्यानंतर बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांतून बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्रातून १ लाख ७८ सहस्र ४०० महिला आणि १३ सहस्र ३३ मुली बेपत्ता झाल्या आहेत.
२. केंद्रशासित प्रदेशांपैकी देहलीमध्ये वर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीत ६१ सहस्र ५४ महिला आणि २२ सहस्र ९१९ मुली बेपत्ता झाल्या आहेत.
संपादकीय भूमिका
|

कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार : २ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
अधिवेशनात ९७ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर, कर्जमाफीसाठी सर्वाधिक प्रावधान !
बिहार : मशिदीच्या काझीने हिंदु तरुणीवर बलात्कार करून व्हिडिओ बनवला
घरावर आलेल्या फांद्या पालिकेने सांगूनही न हटवल्याने त्या काढण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू
हिंदु धर्माच्या विभाजनासाठी प्रियांक खर्गे यांचे षड्यंत्र ! -कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार, भाजप