हिंदु सणांच्या वेळी होणार्‍या दंगली रोखण्यासाठी हिदू बांधवांनी संघटित होण्ो आवश्यक ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘जिहादींच्या सावटाखाली हिंदूंचे सण कधीपर्यंत ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

मुंबई – आज मुसलमान रस्त्यावर नमाजपठण करू शकतात; मात्र श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी हिंदूंनी साधी मिरवणूक काढली, तरी त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. देशात हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी केल्या जाणार्‍या दंगली आणि इतर हिंसक घटना पहाता त्या रोखण्यासाठी हिंदू बांधवांनी आता संघटित होण्याची आवश्यकता आहे, असे उद्गार तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘जिहादींच्या सावटाखाली हिंदूंचे सण कधीपर्यंत?’, या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

धर्मांधांचे समर्थन करणार्‍यांची यंत्रणा मोडून काढायला हवी ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद

श्री. विनोद बंसल

श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या सणांच्या वेळी हिंदूंच्या मिरवणुकांवर पूर्वीही आक्रमणे व्हायची आणि आताही ती चालूच आहेत; मात्र आता हिंदू प्रतिकार करू लागला आहे. बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगड, देहली आदी राज्यांत षड्यंत्रपूर्वक पोलीस-प्रशासनाकडून हिंदूंना मिरवणुका काढण्यास रोखले जात आहे. या मिरवणुकांमध्ये धर्मांधांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदूंना दोषी ठरवून त्यांना अटक केली जात आहे आणि खरे दोषी मात्र मोकाट फिरत आहेत. यामध्ये धर्मांधांचे समर्थन करणार्‍या संघटना, राजकीय नेते आणि सोशल मिडियावर कार्यरत असलेले तथाकथित ‘फॅक्ट चेकर’ (सत्यता तपासणारे) यांचे एकमेकांशी परस्पर संबंध आहेत. या सर्वांची यंत्रणा मोडून काढण्याची आवश्यकता आहे.

भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचा प्रयत्न रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

या वर्षीही हिंदु सणांच्या वेळी दंगली घडवून आणल्या गेल्या. यामध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीत बंदी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) चा सहभाग होता. आज मुसलमानांची लोकसंख्या देशात २५ कोटी झाली असतांनाही त्यांना ‘अल्पसंख्य’ म्हणून संबोधले जाणे, ही हिंदूंच्या डोळ्यात ‘धूळफेक’ करण्याचा प्रकार आहे. आज देशात घडणार्‍या विविध घटनांतून भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. आपला देश दुसर्‍या विभाजनाकडे जातो आहे, ही वास्तविकता डोळ्यांसमोर दिसत आहे. हिंदू संघटित न झाल्यास ते विनाशाकडे जातील. हे टाळण्यासाठी हिंदूंनी आपल्यासमोरील आव्हाने ओळखून जात-पात, संघटना, पद आदी सर्व बाजूला ठेवून आता हिंदु राष्ट्रासाठी संघटित व्हायला हवे.

हिंदूंनी काळाची आवश्यकता ओळखून प्रतिकार करायला शिकायला हवे ! – अधिवक्ता प्रसून मैत्र, अध्यक्ष, ‘आत्मदीप’ संघटना

अधिवक्ता प्रसून मैत्र

बंगालमध्ये मुसलमान समाजाने काहीही केले, तरी त्याला कायदेशीरदृष्टया योग्य ठरवले जाते आणि त्याचे समर्थन केले जाते, अशी तेथील राजकीय पक्षाची मानसिकता आहे. आज हिंदूंना दुर्बल समजून कायद्याचा धाक दाखवला जातो. भगवान श्रीकृष्णाचा शांतीचा प्रस्ताव कौरवांनी धुडकावून लावल्यावर शेवटी पांडवांना युद्ध करावेच लागले. हिंदूंनी सुद्धा आता केवळ वार्तालापाच्या भूमिकेत न जाता काळाची आवश्यकता ओळखून प्रतिकार करायला शिकायला हवे.