प्रत्येक परिस्थितीत हिंदूंनी संघटित रहायला रहावे ! – पंडित धीरेंद्र शास्त्री

बागेश्‍वर धामचे पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र शास्त्री

छतरपूर (मध्यप्रदेश) – प्रत्येक परिस्थितीत हिंदूंनी संघटित रहायला हवे, असे प्रतिपादन बागेश्‍वर धामचे पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी येथे केले. येथील अन्नपूर्णा रामलीला मैदानात त्यांच्या हस्ते रामनवमी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ५ सहस्र नागरिक उपस्थित होते. श्रीरामनवमीनिमित्त येथे प्रत्येक वर्षी विशाल मिरवणूक काढण्यात येते. त्यासाठी येथे कार्यालय स्थापन करण्यात येते.

कार्यक्रमात पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी उपस्थितांकडून हिंदु राष्ट्राचा उद्घोष करवून घेतला. ‘अनेक जण स्वतःला लोकप्रियता मिळण्यासाठी मला आव्हान देत असतात. यापूर्वी मी अनेक आव्हाने स्वीकारून विजयी झालो आहे. मला प्रत्येक वेळी अशी आव्हाने द्यायला मी ‘मागणीनुसार गायन करणार्‍या गायका’प्रमाणे नाही.