प्रदूषणापासून मुक्‍तीसाठी हिंदु धर्मराज्‍याची स्‍थापना अपरिहार्य !

अनेक वर्षांपासून देशात प्रतिवर्षी अनेक ‘रोपे ’ लावली जातात आणि त्‍याद्वारे भ्रष्‍टाचाराचा राक्षस पोसला जात आहे, त्‍यातील अधिकांश रोपांचे वृक्ष होऊ शकत नाहीत. मागील काही दशकांत देशामध्‍ये जेवढ्या काही ‘रोपे लावण्‍याच्‍या योजना’ राबवण्‍यात आल्‍या, त्‍या जर भ्रष्‍टाचाराविना झाल्‍या असत्‍या, तर आज ही पर्यावरणाची समस्‍याच उद़्‍भवली नसती. थोडक्‍यात सांगायचे झाले, तर वायू प्रदूषणासहित सर्व प्रकारच्‍या प्रदूषणासाठी मूळरूपात मनुष्‍याचे धर्माचरणापासून दूर जाणे हेच उत्तरदायी आहे. भ्रष्‍टाचार असो किंवा सुविधा भोगी प्रवृत्ती, हे धर्मापासून दूर जाण्‍याचेच परिणाम आहेत आणि म्‍हणून भौतिक प्रदूषण असो किंवा मानसिक असो अथवा आध्‍यात्मिक प्रदूषण असो या सर्वांचे उत्तर धर्मामध्‍येच आहे. कोणत्‍याही राजकारण्‍यांची कार्यप्रणाली पहाता त्‍यांच्‍याकडून धर्माचरणाची आशा करणे व्‍यर्थच आहे. यातून हेच पुन्‍हा सिद्ध होते की, प्रदूषणापासून मुक्‍ती मिळवण्‍यासाठीही हिंदु धर्मराज्‍याची स्‍थापना अपरिहार्य आहे.’

(साभार : मासिक ‘वैदिक उपासना’, वर्ष १ अंक ६)