
‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा सिद्धांत सर्वसाधारण वस्तू आणि व्यक्ती यांच्या संदर्भात लागू पडतो, संतांच्या बाबतीत नाही ! याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
शब्द : सर्वसामान्य व्यक्तीच्या संदर्भात तिचे गायन एका विशिष्ट काळापेक्षा अधिक वेळ ऐकल्यास कंटाळा येतो; मात्र संतांनी स्वतः गायलेली पदे ऐकतांना त्यांचे गायन कानांना सुमधुर वाटते आणि पुष्कळ काळ ती पदे ऐकता येतात, उदा. प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली भजने.
स्पर्श : सर्वसाधारण वयस्कर व्यक्तीची त्वचा रखरखीत जाणवते; मात्र वयस्कर संतांच्या त्वचेला स्पर्श केल्यास तिचा स्पर्श मऊ असतो, उदा. सनातन संस्थेच्या सद़्गुरु (सौ.) सखदेव आजी यांच्या त्वचेचा स्पर्श अगदी मऊ असायचा.
रूप : सर्वसाधारण व्यक्तीचे हस्ताक्षर किंवा चेहरा, म्हणजे रूप वाईट असले, तर त्यातून वाईट स्पंदने जाणवतात; मात्र संतांचे हस्ताक्षर किंवा चेहरा वाईट असला, तरी त्यातून चांगली स्पंदने जाणवतात.
रस : सर्वसाधारण व्यक्तीच्या घरी शिजवल्या जाणार्या अन्नाची चव सर्वांनाच आवडते असे नाही; मात्र संतांच्या आश्रमातील महाप्रसाद किंवा संत करत असलेल्या भंडार्याच्या वेळी केला जाणारा महाप्रसाद सर्वांनाच रूचकर लागतो.
गंध : सर्वसामान्य व्यक्तीच्या शरिराला दुर्गंध येतो. तो जाण्यासाठी तिला सुगंधी द्रव्यांचा वापर करावा लागतो; मात्र संंतांच्या शरिराला सतत दैवी गंध येत असतो, उदा. प.पू. भक्तराज महाराज यांची अंघोळ होण्यापूर्वीही त्यांच्या शरिराला नेहमी दैवी गंध येत असे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.४.२०१६)
हे ब्राह्मणद्वेष्ट्यांचे पाप आहे !
मुलांवर साधनेचे संस्कार करणारे आणि शेवटपर्यंत देवाच्या अनुसंधानात असणारे बेळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. रामू गणपति मिसाळ (वय ६६ वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मोजावे लागणारे हे मूल्य !
सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी यांची सेवा करत असतांना दाते कुटुंबियांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !