
सातारा, ११ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मोडून तोडून सांगण्याची ‘फॅशन’ होत आहे. राजकीय हेतू ठेवून औरंगजेब, अफझलखान यांचे उदात्तीकरण करण्याची चढाओढ चालू आहे. कुणीही उठतो आणि मनाला वाटेल ते बोलतो. अशा लोकांनी महाराष्ट्रात राहू नये, असे प्रतिपादन सातारा येथील भाजपचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधतांना केले.
ते म्हणाले की, इतिहासातील गोष्टींवर टीकाटिप्पणी करून प्रसिद्धी मिळवणे दुर्दैवी आहे. एका बाजूला ‘छत्रपती आमचे दैवत आहे’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांचे महत्त्व अल्प करायचे. प्रतापगड येथील अफझलखानाच्या वधाचा विषय इतिहासाची उंची अल्प करायला लागला, तर ते चुकीचे आहे.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री