बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा फुकाचा आरोप

पाटलीपुत्र (बिहार) – भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काहीही योगदान नव्हते. संघाला स्वातंत्र्यलढ्याशी काहीही देणेघेणे नव्हते, असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी केला.
बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार ने एक कार्यक्रम के दौरान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और पीएम मोदी पर जमकर निशाना साधा. https://t.co/ZIFPACmQQ5
— AajTak (@aajtak) January 1, 2023
नितीश कुमार म्हणाले की, माझे वडील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. माझा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला; मात्र मी नंतर स्वातंत्र्यलढ्याची प्रत्येक गोष्ट समजून घेतली. भारताच्या स्वातंत्र्यातील म. गांधी यांचे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही; मात्र आता काही लोक राष्ट्रपिताविषयी काय बोलत आहेत हे सर्वजण पहात आहेत. आता हे म्हणत आहेत, ‘जुन्या राष्ट्रपितांना विसरू जा, नवे राष्ट्रपिता आले आहेत.’ या नव्या राष्ट्रपितांनी भारतासाठी काय केले ? त्यांनी काही काम केले आहे का ? त्यांच्या काळात भारत कोणत्या क्षेत्रात पुढे गेला आहे ? त्यांनी केवळ नव्या तंत्रज्ञानाचा बलपूर्वक वापर केला आहे. आधी माध्यमे सरकार असो की विरोधी पक्ष, त्यांच्यावर त्यांची मते अगदी स्पष्टपणे मांडायची; मात्र आज माध्यमांना तेच लिहावे लागत आहे जे सांगितले जात आहे.
संपादकीय भूमिका
|
Kerala Shigella Outbreak Reported : केरळम्मध्ये ‘शिगेला’ संसर्गामुळे एका मुलाचा मृत्यू, १२६ जणांना लागण !
Bijnor Hindu Woman Rape : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे ‘बनावट’ डॉक्टर फैजान याने हिंदु महिलेवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
Jadavpur Bulldozer Action : बंगाल – जाधवपूर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवतांना विरोध !
PM Modi Record : पंतप्रधान मोदी सर्वाधिक काळ सरकारप्रमुख राहिलेले नेते बनले !
Jahangir Khan Arrest : तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांना भारत-नेपाळ सीमेजवळून अटक