मध्यप्रदेशात ३०० जणांची, तर छत्तीसगडमध्ये ७० कुटुंबांची हिंदु धर्मात घरवापसी !

बागेश्‍वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री (डावीकडे)

दमोह (मध्यप्रदेश) – येथे रामकथा कार्यक्रमात बागेश्‍वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री यांनी ३०० लोकांना हिंदु धर्मात आणले. दुसरीकडे छत्तीसगड राज्यातील जशपूर येथे विशाल हिंदु संमेलनामध्ये ‘अखिल भारतीय घरवापसी’चे प्रमुख प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी ५० कुटुंबांना पुन्हा हिंदु धर्मात आणले. या हिंदूंना ख्रिस्ती मिशनर्‍यांनी आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर केले होते. नाताळच्या दिवशीच हा कार्यक्रम पार पडला.

छत्तीसगडच्या नारायणपूर येथेही नाताळच्या दिवशी २० कुटुंबांना गंगाजल देऊन त्यांचीही घरवापसी करण्यात आली.