आठवड्याभरातील दुसरी घटना !

फिरोजपूर (पंजाब) – येथील अबोहर भागात सीमा सुरक्षा दलाचा सैनिक दाट धुक्यामुळे पाकच्या सीमेमध्ये गेल्याने त्याला पाकच्या सैन्याने पकडले. पाकचे सैनिक त्याला भारताकडे सोपवण्यास सिद्ध नाहीत. काही दिवसांपूर्वीही अशीच घटना घडली होती. तेव्हा पाकच्या सैन्याने त्या भारतीय सैनिकाला सोडले होते.
A Border Security Force (#BSF) #jawan, who inadvertently crossed over to the Pakistani side on Wednesday in the #Punjab sector, has been captured by Pakistan Rangers and his handing back is awaited, officials saidhttps://t.co/AzgcDRQVfC
— The Hindu (@the_hindu) December 8, 2022
येथील सीमेवर भारतीय सैनिक नेहमीची गस्त घालतात. या वेळी इतके धुके होते की, या सैनिकाने शून्य रेषा ओलांडली आणि अन्य सैनिकांना तो बेपत्ता झाल्याचेही लक्षात आले नाही. काही वेळाने ते एकत्र जमले असता एक सैनिक बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर तो पाकच्या सीमेमध्ये गेल्याने पाकच्या सैनिकाने त्याला पकडल्याचे त्यांना समजले.
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !