पंढरपूर येथे दर्शनासाठी आलेल्या ३० हून अधिक भाविकांना विषबाधा !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथे दर्शनासाठी आलेल्या मुंबई येथील ३० हून अधिक भाविकांना जेवणातून विषबाधा झाली आहे. चंद्रभागा नदीकाठी असणार्‍या एका उपाहारगृहामध्ये या भाविकांनी जेवण केले होते. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाब  होऊ लागल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू करण्यात आले. या प्रकरणानंतर अन्न आणि औषध विभागाचे पथक पंढरपूर येथे आले असून पोलीस याविषयी अधिक माहिती घेत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रतिदिन मोठ्या प्रमाणात भाविक येतात.