सोलापूर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद चालू असल्याने नगरहून गाणगापूरकडे जाणारी १ बस कर्नाटकच्या सीमेवर थांबवण्यात आली होती. या बसमध्ये ४८ प्रवासी होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. दोन्ही राज्यांतून ये-जा करणार्या बस काही काळ थांबवण्यात आल्या होत्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर येथील काही भागांवर दावा सांगितल्यामुळे महाराष्ट्रातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. या सूत्रावरून होणार्या आंदोलनांमुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी, तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एस्.टी. बसची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. दोन्ही राज्यांतील तणावाचे वातावरण निवळेपर्यंत बससेवा विस्कळीत राहील, अशी माहिती राज्य परिवहन अधिकार्यांच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सीमाप्रश्नामुळे महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांतील बससेवा विस्कळीत !
सीमाप्रश्नामुळे महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांतील बससेवा विस्कळीत !
नूतन लेख
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील वैकुंठभूमीची (स्मशानभूमी) तात्काळ दुरुस्ती करा ! – नागरिकांचे निवेदन
संभाजीनगर येथील घोटाळ्यातील धर्मांधाला ४ वर्षांनंतर बेंगळुरू येथून अटक !
‘पाणथळ वाचवा’ मोहिमेचा कुडचडे येथील नंदा तळे येथे शुभारंभ
केंद्रशासनाच्या अहवालानुसार ३११ प्रदूषित नद्यांच्या सूचीमध्ये गोव्यातील ६ नद्या
आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या दर्शनाला भाविकांचा महासागर
विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी १ कोटी १७ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता !