प्रतिदिन अनेक जण भ्रष्टाचार करत असतांना मुंबई महापालिकेने केवळ ५७ जणांना कामावरून काढणे, हाही भ्रष्टाचाराचा एक प्रकार झाला !

‘वर्ष २००५ ते २०२१ या कालावधीत मुंबई महानगरपालिकेत लाच घेणाऱ्या ५७ कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे. यामध्ये २०० रुपयांपासून ते २ लाख ७५ सहस्र रुपयांपर्यत लाच घेतल्याच्या प्रकरणांचा समावेश आहे.’