कलाकारांनी शहराविषयी विधाने करण्यापूर्वी एकदा विचार करायला हवा !

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री जुही चावला यांनी २ दिवसांपूर्वी ‘हवेत पुष्कळ दुर्गंधी पसरलेली आहे. आधी ती वांद्रे आणि वरळीजवळील भागातील खाडीच्या ठिकाणाहून जाताना जाणवायची. आता ती संपूर्ण दक्षिण मुंबईत पसरली आहे. दुर्गंधी आणि हवेतील प्रदूषण यांमुळे दिवसेंदिवस आम्हाला गटारात रहात असल्यासारखे वाटत आहे’, अशा आशयाचे ट्वीट केले होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘“मुंबई हे एक महान शहर आहे. या शहरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे, हे खरे आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारामुळे नागरिकांना काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे; पण आता सरकार पालटले आहे. लवकरच मुंबईही पालटणार आहे. त्यामुळे मुंबईविषयी अशाप्रकारे बोलणे चुकीचे आहे. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे कलाकारांनी अशी विधाने करण्यापूर्वी एकदा विचार करायला हवा.’’
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !