
कोल्हापूर – दीपावलीच्या पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिरातील मुख्य शिखरावर पश्चिमेकडे सर्वांत उंचावर कापूर लावतात, त्यास ‘काकडा’ म्हणतात. हा ‘काकडा’ २४ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. आकाशासाठी म्हणजेच वायूसाठी पूर्वीच्या काळातील सर्वोच्च स्थान म्हणजे मंदिराचे शिखर, त्या ठिकाणी देवतेचा वास असतो. या भावनेतूनच काकडा प्रज्वलित करण्याची परंपरा चालू झाली.
पहाटे २ वाजता मशालीच्या मंद उजेडात काकडा प्रज्वलित करतात. यानंतर हातात काकडा घेऊन मुख्य शिखराकडे पाठ करून वर चढणे आणि प्रज्वलित करून पुन्हा खाली उतरणे, ही सेवा श्री महालक्ष्मीदेवीवर श्रद्धा असलेल्या निस्सीम भक्तीमुळेच भाविक करू शकतात. त्रिपुरी पौर्णिमेला मंदिरातील दीपमाळा पालखी सोहळ्याच्या वेळी प्रज्वलित करतात.
वडापावसाठी वर्तमानपत्राचा वापर करणार्या विक्रेत्यांवर कारवाई !
वाढत्या मानसिक ताणामुळे ३ वर्षांत देशातील ४३८ सैनिकांच्या आत्महत्या !
चंद्रपूर येथील ‘कॅन्सर रुग्णालया’वर सायबर आक्रमण !
वरळी डोम येथील पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमात तरुणाचा मृत्यू !
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी