
गोवंडी (मुंबई) – काचेच्या बाटलीत फटाके फोडण्यास बंदी करणारे सुनील नायडू (वय २१ वर्षे) यांची तीन अल्पवयीन मुलांनी हत्या केली. गोवंडी येथील शिवाजीनगर भागात २४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ही घटना घडली आहे.
१२ वर्षीय मुलाने काचेच्या बाटलीमध्ये फटाके फोडले. ‘काचा उडून त्या सर्वांना लागतील’, असे सुनील यांनी मुलाला सांगितले. याचा राग डोक्यात ठेवून या मुलाने त्याचा १५ वर्षीय भाऊ आणि १४ वर्षीय मित्र यांच्या साहाय्याने सुनील यांना मारहाण केली. १५ वर्षीय मुलाने सुनील यांच्या मानेत चाकू खुपसला. त्यानंतर सुनील तिघांच्या मागे पळत गेले; पण काही वेळाने ते जिन्यात कोसळले. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांना रुग्णालयात नेले; मात्र आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला असून दोन अल्पवयीन मुलांना कह्यात घेतले आहे, तर एकाचा शोध चालू आहे.
संपादकीय भूमिकासंवेदनशीलता संपत चालल्याने मुलांमध्ये हिंसकता वाढत चालली आहे, हे दर्शवणारी घटना ! |
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांसाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली’ घोषित !
ग्रामीण पातळीपर्यंत दर्जेदार इंटरनेटसाठी ‘महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ स्थापन !