
गोवंडी (मुंबई) – काचेच्या बाटलीत फटाके फोडण्यास बंदी करणारे सुनील नायडू (वय २१ वर्षे) यांची तीन अल्पवयीन मुलांनी हत्या केली. गोवंडी येथील शिवाजीनगर भागात २४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ही घटना घडली आहे.
१२ वर्षीय मुलाने काचेच्या बाटलीमध्ये फटाके फोडले. ‘काचा उडून त्या सर्वांना लागतील’, असे सुनील यांनी मुलाला सांगितले. याचा राग डोक्यात ठेवून या मुलाने त्याचा १५ वर्षीय भाऊ आणि १४ वर्षीय मित्र यांच्या साहाय्याने सुनील यांना मारहाण केली. १५ वर्षीय मुलाने सुनील यांच्या मानेत चाकू खुपसला. त्यानंतर सुनील तिघांच्या मागे पळत गेले; पण काही वेळाने ते जिन्यात कोसळले. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांना रुग्णालयात नेले; मात्र आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला असून दोन अल्पवयीन मुलांना कह्यात घेतले आहे, तर एकाचा शोध चालू आहे.
संपादकीय भूमिकासंवेदनशीलता संपत चालल्याने मुलांमध्ये हिंसकता वाढत चालली आहे, हे दर्शवणारी घटना ! |
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री