मुंबई येथे धर्मांधाने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याचे प्रकरण

मुंबई – येथील वातावरण आधीच खराब आहे. हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण नाही. आमच्या भागात यायचे नाही. आमच्या समाजाला त्रास झाला, तर आम्ही तुला सोडणार नाही, अशी धमकी ‘लव्ह जिहाद’चे वृत्त देणार्या दैनिक ‘तरुण भारत’च्या पत्रकार योगिता साळवी यांना धर्मांधांनी दिली. मागील आठवड्यामध्ये चेंबूर येथे इक्बाल शेख याने त्याची पत्नी रूपाली चंदनशिवे हिची भर रस्त्यात गळा चिरून हत्या केली. याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी मृत रूपाली हिच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलेल्या पत्रकार योगिता साळवी यांना अडवून धर्मांधांनी धमकी दिली. या प्रकरणी योगिता साळवी यांनी चेंबूर येथील टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
इक्बाल शेख याने पत्नीने इस्लामप्रमाणे आचरण करावे, यासाठी तिला मारहाण केली होती. ती बुरखा घालत नसल्याच्या रागातून इक्बाल याने २६ सप्टेंबरच्या रात्री भर रस्त्यात गळा चिरून तिची हत्या केली. १ ऑक्टोबर या दिवशी चेंबूर येथे रूपाली हिच्या कुटुंबियांची भेट घेऊन परतत असलेल्या योगिता आणि साळवी आणि त्यांच्या २ मैत्रिणी यांना धर्मांध पुरुष आणि महिला यांनी थांबवून धमकी दिली. धर्मांध महिलेने आरडाओरड करून अन्य धर्मांधांना गोळा करून योगिता साळवी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
संपादकीय भूमिका
|
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करून धर्मांधाचा धिंगाणा, अश्लील भाषेत शिवीगाळ !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !