मदरशांमध्ये वाईट कृत्ये करणारे सापडल्यास त्यांना सरकारने गोळ्या घालाव्यात; पण त्यांच्यामुळे मुसलमानांना अपकीर्त करू नये !

‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल यांचे विधान !

‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल

गौहत्ती (आसाम) – जर मदरशांमध्ये वाईट कृत्ये करणारे लोक सापडत असतील, तर आम्हाला त्यांच्याविषयी जराही सहानुभूती नाही. सरकारने अशांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे विधान ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी केले.

अजमल पुढे म्हणाले की, जर मदरशांमध्ये १-२ वाईट शिक्षक सापडत असतील, तर सरकारने त्यांची चौकशी करावी. त्यात ते दोषी आढळल्यास सरकारने त्यांच्यावर  कारवाई करावी; पण त्यांच्यामुळे संपूर्ण मुसलमानांना ‘जिहादी’ म्हणणे योग्य नाही. हा ‘जिहाद’ नाही, तर ‘आतंकवाद’ आहे. सरकारने तो रोखला पाहिजे. सरकारने भारताच्या सीमांचे रक्षण केले पाहिजे. गुप्तचर यंत्रणांना सशक्त केले पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • गेल्या ३ दशकांत जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात किती मुसलमानांनी तोंड उघडले आहे ? उलट मुसलमान नेत्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे, याविषयी अजमल का बोलत नाहीत ?
  • मशिदीसमोरून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका गेल्यावर होणार्‍या आक्रमणांना मुसलमान नेते आणि त्यांच्या धार्मिक संघटना विरोध का करत नाहीत आणि अशा घटना रोखण्यासाठी ते पुढे का येत नाहीत ?
  • पोलीस जेव्हा जिहादी आतंकवाद्यांना चकमकीत ठार मारतात, तेव्हा ‘ठार झालेले आतंकवादी नव्हते’, असा गळा काढण्यामध्ये मुसलमानच पुढे असतात ! त्यांच्या अंत्ययात्रेतही ते मोठ्या संख्येने सहभागी होतात, याविषयी अजमल का बोलत नाहीत ?