१० विद्यार्थी पोलिसांच्या कह्यात !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील ५ प्रसिद्ध शाळांतील २०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या टोळ्या बनवल्या आहेत. या टोळ्या एकमेकांवर गावठी बाँब फेकून स्फोट घडवून आणत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेक स्फोट घडवून आणले आहेत. ‘तांडव’, ‘माया’ आणि ‘अमर’ नावाच्या या टोळ्या आहेत. पोलिसांनी १० विद्यार्थ्यांना कह्यात घेतले होते. १५, १६ आणि २२ जुलै या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या गावठी बाँबच्या स्फोटांत ते सहभागी होते. पोलिसांनी त्यांच्या कह्यातून अनेक दुचाकी गाड्या, १२ भ्रमणभाष संच आणि काही गावठी बाँब जप्त केले. जे या टोळ्यांत सहभागी असू शकतात, अशा विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. गावठी बाँबच्या स्फोटांत गुन्हेगारी टोळ्या सहभागी असाव्यात, असा संशय पोलिसांना होता; पण यामागे विद्यार्थ्यांचा हात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
प्रयागराज में बिच्छू गैंग का कोहराम! जुलाई में अब तक 22 दिनों में 6 बार छात्रों के इस गैंग ने स्कूलों के सामने बमबाजी कर दहशत फैलाई है #Prayagraj https://t.co/ONOKEjV0jx
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) July 26, 2022
१. पोलीस वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेश पांडे यांनी सांगितले की, हे विद्यार्थी परस्परांवर आक्रमण करत होते आणि गावठी बाँबही फेकत होते. आरोपी दुचाकी वाहनांवर फिरत असत आणि नेहमी चेहरा झाकून घेत असत.
२. या विद्यार्थ्यांनी टोळीसाठी सामाजिक माध्यमांवर स्वतःचे खातेही बनवले आहे. त्यावर ते दुसर्या टोळीवर वर्चस्व दाखवण्यासाठी बाँबस्फोटांची छायाचित्रे पोस्ट करतात.
संपादकीय भूमिकाविद्यार्थी गावठी बाँब बनवेपर्यंत याची कुणालाच माहिती मिळू नये, हे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे ! |
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)