परराष्ट्रमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त !

नवी देहली – आफ्रिकी देश कांगोमधील बुटेम्बो शहरात २६ जुलै या दिवशी आंदोलनकर्त्यांनी ‘संयुक्त राष्ट्र शांती सैन्या’च्या विरोधात केलेल्या संघर्षात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे २ सैनिक मारले गेले. यावर परराष्ट्रमंत्री एस्.जयशंकर दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, लोकशाही प्रजासत्ताक कांगोमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या दोन शूर भारतीय सैनिकांच्या मृत्यूविषयी मला तीव्र दु:ख झाले. ते ‘मोनुस्को’चा (लोकशाही प्रजासत्ताक कांगो येथील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेचा) भाग होते. संबंधित दोषींना कठोर शासन झाले पाहिजे.
डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो में सीमा सुरक्षा बल के दो वीर भारतीय शांति सैनिकों की मृत्यु पर गहरा दुख हुआ। वे MONUSCO का हिस्सा थे।
इन नृशंस हमलों के अपराधियों की जवाबदेही तय की जानी चाहिए और उन्हें न्याय के कटघरे में खड़ा किया जाना चाहिए। https://t.co/xg2ZBcTFG4
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) July 26, 2022

2 Indian UN Peacekeeping Force killed in Congo All #Defence #news and #updates: https://t.co/MRkaJarm2n https://t.co/boL2n7getL
— ET Defence (@ETDefence) July 27, 2022
संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती यांनीही ‘भारतासाठी हा पुष्कळ मोठा धक्का आहे’, असे म्हटले आहे. कांगो हा देश गेल्या अनेक वर्षांपासून गृहयुद्धाला सामोरा जात आहे. सुंयक्त राष्ट्रांचे शांती सैन्य वर्ष १९९९ पासून तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नरत आहे. यामध्ये विविध देशांच्या २० सहस्र शांती सैनिकांचा समावेश असून त्यांतील ४ सहस्र सैनिक हे एकट्या भारताचे आहेत.
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’
Siliguri Corridor : सिलीगुडी कॉरिडॉर आता ‘चिकन नेक’ राहिलेला नाही, तर ‘एलिफंट्स ट्रंक’ बनला !