
देहराडून – मंगलौर (हरिद्वार) या मुसलमानबहुल शहरातील पशूवधगृहांवरील बंदी उत्तराखंड उच्च न्यायालयाने १० जुलै या दिवशी असलेल्या बकरी ईदपुरती उठवली. हरिद्वार येथे मार्च २०२१ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने उत्तराखंडमधील भाजप शासनाने हरिद्वार जिल्ह्यातील सर्व पशूवधगृहांवर बंदी आणत त्यांची अनुज्ञप्ती रहित केली होती. हा आदेश २ महानगरपालिका, २ नगरपालिका आणि ५ नगर पंचायत यांच्या क्षेत्रांसाठी लागू होता.
Uttarakhand High Court permits animal slaughter for Bakri Eid in Manglaur
report by @DebayonRoy https://t.co/TSeOyVm2yq
— Bar & Bench (@barandbench) July 7, 2022
सरकारच्या या निर्णयाला फैसल हुसेन या व्यक्तीने न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. या याचिकेत त्यांनी ‘मंगलौर नगरपालिकेच्या क्षेत्रात ९० टक्के मुसलमान रहात असल्याने तेथे पशूवधगृहे चालू करण्याची अनुमती मिळावी’, अशी मागणी केली होती. यावर उत्तराखंड उच्च न्यायालयात ७ जुलै या दिवशी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ‘बकरी ईदच्या दिवशी जिल्ह्यातील मंगलौर शहरातील पशूवधगृहांवरील बंदी उठवण्यास आम्ही अनुमती देत आहोत. पशूंची हत्या ही केवळ पशूवधगृहातच करता येईल’, असे स्पष्ट केले.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’