आतंकवादाचे प्रशिक्षण देणारे मदरसे बंद करावेत ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

उदयपूरमध्ये (राजस्थान) कन्हैयालाल यांच्या दुकानात ग्राहक बनून छुप्या पद्धतीने मुसलमानांनी त्यांची हत्या केली. कमलेश तिवारी यांचीही अशाच प्रकारे हत्या केली गेली. ही वीरता नसून नपुंसकता आहे. हिंदु समाज असा नाही. उलट तो राज्यघटनेच्या रूपात स्वतःची बाजू समोर मांडतो. जराही संयम न ठेवता सुरे घेऊन हत्या करणे, हा कुठला धर्म ? ‘आतंकवादाचा प्रारंभ मदरशांच्या मानसिकतेतून चालू होतो’, असे केरळचे राज्यपाल महंमद आरिफ यांनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे चीनने मदरशांमध्ये काय शिकवावे आणि काय नाही ? यांवर नियंत्रण ठेवले, त्याप्रमाणे भारत सरकारनेही केले पाहिजे. सरकारने मदरशांना निधी देणे बंद करावे, तसेच आतंकवादी प्रशिक्षण देणारे मदरसे बंद केले पाहिजेत.