चीनकडून २ वर्षांनंतर भारतियांवरील व्हिसाबंदी मागे !

प्रतीकात्मक छायाचित्र

बीजिंग (चीन) – गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे चीनने भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थी यांना व्हिसा देण्यावर घातलेली बंदी मागे घेण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे चीनच्या विविध शहरांत काम करणारे भारतीय कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे.