शेवटचा एक दिवस शिल्लक; भोंगे बंद झालेच पाहिजेत ! – मनसे

नवी मुंबई, ३ मे (वार्ता.) – हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणारच ! शेवटचा १ दिवस शिल्लक आहे. भोंगे बंद झालेच पाहिजेत, असे ‘ट्वीट’ मनसेचे नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे यांनी केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत उतरवण्याची चेतावणी दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर गजानन काळे यांनी हे विधान केले.