२६.१२.२०२१ या दिवशी कोची, केरळ येथील श्रीमती प्रियदर्शिनी बांदिवडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूच्या वेळी त्यांचे वय ७५ वर्षे होते. केरळ येथील साधिकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. कष्टाळू
श्रीमती बांदिवडेकरकाकूंना कितीही बरे नसले, तरी त्यांना थोडे बरे वाटले की, त्या घरातील सर्व कामे करायच्या.
२. त्यागी वृत्ती

एके काळी काकूंना पुष्कळ आर्थिक अडचणी होत्या, तरीही त्यांनी केरळ येथील सेवाकेंद्रासाठी त्यांच्या घराची भूमी अर्पण केली. आज केवळ काकूंच्या त्यागामुळेच केरळ येथील साधकांची निवासव्यवस्था झाली आहे. त्याबद्दल आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटते.
३. भाव आणि श्रद्धा
त्यांच्यात प.पू. गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती) पुष्कळ भाव होता. त्यांची प.पू. बाबांच्या प्रती (प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रती) श्रद्धा होती.
४. काकूंच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

अ. काकूंचे पहाटे झोपेत निधन झाले. काकूंच्या शेवटच्या दर्शनाच्या वेळी ‘त्या गुरुचरणी आनंदावस्थेत आहेत’, असे आम्हाला जाणवले.
आ. त्यांच्या तोंडवळ्यावर प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) अस्तित्व अनुभवायला मिळाले.
इ. ‘काकू साधनेत पुढे जाण्यासाठी गुरूंच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करत आहेत’, असे आम्हाला जाणवले.
ई. आम्हाला वातावरणात दाब जाणवला नाही.
उ. त्यांचे निधन झाल्याच्या दिवशी केरळ येथील सर्व दुकाने बंद होती; मात्र त्यांचे मृत्यूत्तर क्रियाकर्म करायला लागणाऱ्या सर्व गोष्टी वेळेत मिळाल्या. त्यामुळे सर्व विधी सुरळीत पार पडले.
‘श्रीमती प्रियदर्शिनी बांदिवडेकरकाकूंमधील गुण आम्हाला आत्मसात करता येऊ देत’, ही गुरुचरणी प्रार्थना !’
– श्रीमती सौदामिनी कैमल (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के (वय ८० वर्षे) आणि सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर, केरळ (२८.१२.२०२१)
| या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
भावाच्या स्तरावर प्रयत्न करून भावानंद अनुभवणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (वय ४३ वर्षे) !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री राजमातंगी महायज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना आणि प्रत्यक्ष यज्ञस्थळी साधिकेला आलेल्या अनुभूती
धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा (श्री सरस्वतीदेवीचे मंदिर) नमाजमुक्त होणे आणि लगेचच प्रभादेवी, मुंबई येथे श्री राजमातंगीदेवीचा महायज्ञ होणे, हे दैवी संकेत !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !