म. गांधी यांच्यावरील विधानाविषयी पश्‍चात्ताप नाही ! – कालीचरण महाराज

 

इंदूर (मध्यप्रदेश) – मोहनदास गांधी यांच्याविषयी केलेल्या माझ्या वक्तव्याविषयी मला काहीच पश्‍चात्ताप होत नाही. कलियुगात सत्य बोलल्यामुळे मला शिक्षा झाली आहे, असे विधान कालीचरण महाराज यांनी जामिनावर सुटल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना केले. कालीचरण महाराजांच्या समर्थकांनी त्यांचे इंदूर येथील विमानतळावर भव्य स्वागत केले.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराजांनी गांधी यांची हत्या करणारे पंडित नथुराम गोडसे यांचे कौतुक केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली होती.