मुंबई – कोरोना काळात राज्यातील सहस्रो विद्यार्थ्यांवर कलम १८८ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. हे गुन्हे गृह विभाग मागे घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना पारपत्र आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण होत असल्यामुळे गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या कालावधीत जे विद्यार्थी आणि नागरिक यांच्यावर गुन्हे नोंद आहेत, त्यांना परदेशात जाण्यासाठी पारपत्र काढतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत लवकरच हा विषय मांडण्यात येणार आहे. तसेच ‘बैलगाडा शर्यती चालकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे’, असे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी सांगितले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > राज्यातील सहस्रो विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
राज्यातील सहस्रो विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
नूतन लेख
- शिरस्त्राण परिधान न केलेल्या दुचाकीचालकाची अनुज्ञप्ती रहित करणार ! – गोवा पोलीस
- दादर रेल्वेस्थानकाबाहेरील रस्त्याला मद्यपींच्या अड्डयाचे स्वरूप !
- जैन विकास आर्थिक महामंडळावरील श्वेतांबर जैन सदस्यांच्या निवडीला दिगंबर जैन समाजाचा विरोध !
- स्वच्छता अभियानात कोल्हापूर जिल्ह्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम !
- नागपूर येथे शाम मानव यांचा कार्यक्रम भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून बंद पाडण्याचा प्रयत्न
- मुंबई पोलिसांच्या बैठकीमध्ये अतीमहनीय व्यक्तींच्या सुरक्षा अधिकार्यांनी मांडला अडचणींचा पाढा !